किसान विकास पत्र: 115 महिन्यांत पैसे दुप्पट, पोस्ट ऑफिसची ही सर्वोत्तम मुदत ठेव योजना
किसान विकास पत्रातील गुंतवणूकीची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल.या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकार दर तीन महिन्यांनी सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे.
पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. यातील अनेक योजना लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना.आजकाल तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र हा पर्याय म्हणून निवडू शकता.पोस्ट ऑफिसची ही योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहे, कारण 120 महिन्यांऐवजी, गुंतवलेली रक्कम केवळ 115 महिन्यांत दुप्पट होते.या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकार सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे.तसेच पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी गुंतवणूक केली आहे.
किती व्याज मिळत आहे???
किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर सरकार 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज देत आहे. तुम्ही या योजनेत रु. 1000 पासून गुंतवणूक करू शकता.
यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते.या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकता.तसेच किसान विकास पत्रामध्ये नॉमिनी सुविधा देखील उपलब्ध आहे.
व्याज कसे मोजले जाते???
किसान विकास पत्रातील गुंतवणूकीची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल. जानेवारी २०२३ मध्ये, सरकारने किसान विकास पत्राचा maturity कालावधी १२३ महिन्यांवरून १२० केला होता.आता ते आणखी कमी करून 115 महिने करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवरील व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते.
खाते कसे उघडायचे???
किसान विकास पत्र योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते. तथापि, प्रौढ व्यक्ती त्याच्या वतीने खाते उघडू शकतो आणि अल्पवयीन होताच 10 वर्षांचे झाले की त्याच्या नावावर,खाते ट्रान्सफर केले जाते. या योजनेसाठी खाते उघडणे खूप सोपे आहे.यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल.अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल.
किसान विकास पत्र ही अल्पबचत योजना आहे. दर तीन महिन्यांनी सरकार आपल्या व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार बदल करते.
0 टिप्पण्या